पिंपळे गुरव (Pclive7.com):- पिंपळे गुरव परिसरातील वटवृक्षांनी मोकळा श्वास घेतला आहे. वट पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाला बांधलेले सूत कापुन टाकून त्याचे योग्य त्या ठिकाणी विर्सजन करण्यात आले. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून या संस्थेच्या मार्फत हे काम करत असल्याचे शहाराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुरुषांच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यानंतर संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी परीसरातील महिलांनी वटवृक्षाला सूत,आंब्याचा नैवेद्य, धान्य वाहिले जाते, त्यानंतर ते तसेच राहते. पावसाळी दिवस असल्याने तेथे दुर्गंधी पसरते. आणि सूतामध्ये माती जाऊन बसते, त्यामुळे रोगराई पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिक आजारी पडतात आणि झाडांची वाढ खुंटते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन झाडांना बांधलेले सूत कापुन टाकून त्याचे योग्य त्या ठिकाणी विर्सजन करण्यात आले. आम्ही गेल्या चार वर्षांपासून हे काम करत असल्याचे शहाराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, सहसचिव गजानन धाराशिवकर, युवक सचिव, अक्षय जगदाळे,मुरलीधर दळवी, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, पंडित हनुमंत, प्रकाश बंडेवार, जनाबाई इथापे, श्रीनिवास पानसरे, येळवे मल्हारराव, एल्लापा पौगुडवाले, सचिन सागवे, रविंद्र सुर्वे, आदिंनी सहभाग नोंदवला.