पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक दि.२६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जत दरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतले जाणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
याशिवाय, अन्य १३ गाड्या पुण्यापर्यंत तसेच पुण्यापासून पुढे धावणार आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळे या आठ दिवसांत प्रवाशांनी मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे