परळी (Pclive7.com):- मागील सरकारच्या काळात बंद पडलेले महामंडळ भाजपा सरकारने चालू करून समाजात नवीन आशा निर्माण केलेली आहे. येणाऱ्या काळात अनेक योजना समाजासाठी आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या लाडक्या ताई पंकजा मुंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन परळीकरांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.
आज मा. ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्राचारार्थ परळी बीड येथील अक्षता मंगल कार्यालय येथे अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातंग समाजाचा जाहीर मेळावा पार पडला. अमित गोरखे पुढे म्हणाले की, समाजाला गेले पाच वर्षे मागच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड यातना भोगाव्या लागल्या त्यामुळे समाज वीस वर्षे मागे पडला परंतु युती सरकारच्या काळात समाजाला न्याय दानाचे काम खऱ्या अर्थाने महामंडळ चालू करून व अण्णा भाऊ साठे जन्म शताब्दी महोत्सवास १०० कोटी रु देऊन पूर्णत्वास गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व ना.पंकजाताई मुंडे -पालवे यांच्या मार्गदर्शनामुळे येणाऱ्या काळात समाजाला नवी दिशा नक्कीच मिळणार असून नव नवीन योजना पूर्णत्वास नेण्याचे काम हे सरकारच करेल यावेळी आपल्या बोलताना साठे महामंडळाच्या विविध योजनांविषयी माहिती अमित गोरखे यांनी दिली.
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, येणाऱ्या काळामध्ये समाजाला महामंडळाच्या माध्यमातून अनेक जाहीर झालेल्या योजनांचा लाभ परळी विधानसभा मतदार संघमधील समाजासाठी व महाराष्ट्रातील तमाम समाजासाठी वापरता येईल तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्याचे काम भाजपा सरकारने केलेले आहे. यावेळी खा.प्रितमताई मुंडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे प्रा, टी.पी.मुंडे, दीपक चखाले,सागर गायकवाड, भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शकिर शेख,नरेंद्र सिंग राजपूत, किशोर खंडागळे, अमोल कुचेकर,जोगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते.