पुणे (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पुणे शहरामध्ये आणि परिसरामध्ये परदेशातून आलेले देशी, विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी हा आदेश दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पान टपऱ्या पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.






















Join Our Whatsapp Group