राष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती युवा पुरस्कार विजेते अमित गोरखे यांचे प्रतिपादन
पिंपरी (Pclive7.com):- युवकांनी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहिले, त्याचबरोबर ध्येय निष्ठा आणि चिकाटी या त्रिसूत्रीवर सातत्याने काम केले, तर तो युवा निश्चित जीवनात यशस्वी होतो. स्वामी विवेकानंदजींनी भारताचा सांस्कृतिक वारसा संपूर्ण जगामध्ये आपल्या प्रतिभाशाली वक्तृत्वाच्या जोरावर पसरविला. त्याच स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारीला जयंती साजरी केली जाते. व तो दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते अमित गोरखे यांनी युवकांसोबत ऑनलाईन द्वारे संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.
आजच्या युवकांनी कोरोना काळ याला सकारात्मक भावनेने घेऊन या काळात जास्तीत जास्त वेळ अभ्यास, योग साधना आत्मचिंतन या गोष्टींकडे देऊन आपल्या अभ्यासाबरोबर चालू घडामोडी विषयी नॉलेज वाढवून येणाऱ्या काळामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून त्यावर विजय संपादन करण्यासाठी ध्येय ठेवले पाहिजे. जेणेकरून येणारा काळ युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल.असे ते म्हणाले.
युवकांना प्रत्येक गोष्टीत कष्टाचे चीज आणि खडतर काम करण्याची सवय ही पालकांनी लावली पाहिजे. कुठलीही गोष्ट सहज जर त्या युवा पिढीला मिळाली तर त्याचे मूल्य तो करू शकत नाही. त्यामुळे जीवनाचा खडतर प्रवास ज्या युवकांना मिळाला तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो असे ते पुढे म्हणाले.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नोव्हेल इन्स्टिट्यूटच्या वतीने अमित गोरखे यांचा संवाद आयोजित केला होता. त्या प्रसंगी त्यांनी ऑनलाइन वर्च्युअल मीटिंग मधून युवकांशी संवाद साधला. पाचशेपेक्षा जास्त तरुणवर्ग यावेळी उपस्थित होता. प्राचार्य वैभव फंड यांनी आभार मानले.