पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. कविताताई पंढरीनाथ दळवी व अनिकेत पंढरीनाथ दळवी यांनी पुढाकार घेतला असून दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर, चिंचवडेनगर, शिवनगरी, वाल्हेकरवाडी परिसरात जनजागृती सुरु केली आहे.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिम सुरू केली आहे.
या मोहिमेसाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान या अभियानात सर्वांनी सामील व्हावे. तसेच या अभियानाच्या अंतर्गत झोपडपट्टी, चाळी, वसाहती मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारतींसह पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंगा डौलाने फडकविण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी करावा. आणि स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने, हर्ष अणि उल्हासाने सर्वांनी मिळून साजरा करावा असे आवाहन कविताताई दळवी यांनी केले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या सोशल मिडीयावर. फेसबुक, ट्विटर, इस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, स्टेट्सला तिरंगा ठेवून देशाचा अभिमान वाढवावा, ज्यांना आपल्या घरी, सोसायटीमध्ये तिरंगा फडकावायचा आहे त्यांनी आमच्या निवासस्थानी दि.१३ ऑगस्टपर्यंत दळवीनगर (मोबा.९७३०२५४००१, ९८८१४८५७८५) येथे भेट देवून तिरंगा ध्वज मोफत घेवून जावा असे आवाहन देखील कविताताई दळवी यांनी दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर, चिंचवडेनगर, शिवनगरी, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना केले आहे.