मुंबई (Pclive7.com):- भीमा कोरेगाव प्रकरणी आजच्या सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच हा संंप मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
याकूब मेननच्या केसचा संदर्भ घेऊन संभाजी भिडे, एकबोटे आणि घुगेवर कारवाई करावी, अशी मागणी केली. ही घटना भीमा कोरेगाव येथे न घडता जवळच्या सणसवाडी गावता झाली होती. यामुळे हा या तिघांचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केले.