पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी, मोहननगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेत रस्ता बाधित तसेच आरक्षण बाधितांना घरे मिळावीत अशी मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर परिसरातील अनेक नागरिकांची घरे रस्त्यामध्ये गेलेली आहेत. या नागरिकांनी आकुर्डी (मोहननगर) येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांसाठी अर्ज केलेला होता. परंतु नुकत्याच झालेल्या लकी ड्रॉ मध्ये त्यांचा नंबर लागलेला नाही. हे नागरिक अनेक वर्षापासून घरापासून वंचित आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घरकुल योजनेत, प्राधिकरण योजनेत, पंतप्रधान आवास योजनेत या लोकांनी अनेक वेळा अर्ज करून देखील ते घरापासून वंचित आहेत.
पूर्वी यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुद्धा वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. आता या गोरगरीब लोकांना उर्वरित फ्लॅटमध्ये स्वतःचे घर मिळवून देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मीनल यादव यांनी केली आहे. आयुक्तांना निवेदन देतेवेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेविका मीनल विशाल यादव तसेच रस्ता बाधित नागरिक सर्व उपस्थित होते.