आळंदी (Pclive7.com):- श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या विश्वस्त मंडळाची मासिक बैठक आज (दि.२९) आळंदी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सन २०२४ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळा प्रमुख म्हणून संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी ऍड राजेंद्र बा. उमाप, प्रमुख विश्वस्त, डॉ. भावार्थ रा. देखणे, विश्वस्त आणि योगी निरंजन नाथ विश्वस्त उपस्थित होते. याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.