पिंपरी (Pclive7.com):- मराठा बटालिन (काली पाचवी) च्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ३०० सैनिक पत्नींचा विशेष सन्मान पिंपळेगुरव येथील निळुफुले नाट्यगृहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप युवामंच आणि शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अश्विनी लक्ष्मण जगताप या होत्या. अश्विनी जगताप यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
अश्विनी जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित ३०० सैनिक पत्नींना साडी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, गिरीजा शितल शिंदे उपस्थित होते.
यावेळी कर्नल अमनमोहन यांना भक्ती शक्तीचे प्रतिक संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आभार नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मानले. तर सुत्रसंचालन पिंपरी चिंचवड भाजप सोशल मिडीया अध्यक्ष रणजित इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश कवटेकर, रणजित इंगळे आणि सागर वाडीया यांनी विशेष परिश्रम घेतले.