पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी गावामध्ये गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली आणि एक प्रेरणादायी परंपरा बनलेली गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यंदाही अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला. हा कार्यक्रम (दि.२९) रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर, यादवनगर, कुदळवाडी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन आमदार महेशदादा लांडगे युवा मंच, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान कुदळवाडी, तसेच श्री. दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
१० वी व १२ वी परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि शुभेच्छा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा ठरला असून, त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.

प्रेरणादायी मार्गदर्शन
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते न्यायाधीश श्री. रमेश संभाजीराव उमरगे (शिवाजीनगर कोर्ट, पुणे) यांचे सखोल व विचारप्रवर्तक मार्गदर्शन. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य, कठोर परिश्रम, योग्य दिशा व सामाजिक जबाबदारी या बाबतीत प्रभावी विचार मांडले. त्यांच्या भाषणाने पालक व विद्यार्थी दोघांनाही स्फूर्ती मिळाली. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, समाजसेवक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाची प्रशंसा करत आयोजकांचे आभार मानले.
इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निशा दिनेश यादव व श्री. दिनेश लालचंद यादव (सदस्य, फ प्रभाग, पिंपरी चिंचवड महापालिका) यांनी सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी पुढील वर्षी अधिक उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
दरवर्षी कुदळवाडीमध्ये आयोजित होणारा हा कार्यक्रम गावातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरतो आहे. हा उपक्रम शैक्षणिक प्रोत्साहनाबरोबरच समाजिक जाणीव निर्माण करणारा आहे, आणि पुढील पिढीला योग्य दिशा देणारा आदर्श ठरत आहे. यावेळी उपस्थित मान्यवर संतोष मोरे, किसन यादव, दत्तात्रय मोरे, पांडुरंग बालघरे, तात्यासाहेब सपकाळ, किशोर बालघरे, लालचंद यादव, विशाल बालघरे, विजयराज यादव, केरुभाऊ बालघरे, रामकृष्ण लांडगे, पंडित बालघरे, काका शेळके, शरद गोरे, दिपक घन, स्वराज पिंजण, शाम थोरात, चंद्रकांत जाधव, शंकर बनसोडे हे उपस्थित होते. सुत्रसंचालन नितीन साळी यांनी केले.






















Join Our Whatsapp Group