पिंपरी (Pclive7.com):- अहमदनगर येथून मुंबई येथे बेकायदेशीररीत्या टेम्पोतून घेऊन जाणारे सहा टन गोमांस हिंदू आघाडी गोरक्षण विभाग आणि बजरंग दल यांनी पोलिसाच्या मदतीने सोमवारी रात्री पिंपरी येथे पकडले.
अहमदनगर येथून गायी व बैलाचे मांस मुंबई येथे विक्रीसाठी टेम्पोतुन घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनंतर शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्याण अधिकारी), कुणाल साठे, मंगेश नढे , सचिन जवळगे, गौरव कुदळे यांनी जुना पुणे-मुंबई रस्त्यावर सापळा रचला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. टेम्पो चालक गोरक्षकांची नजर चुकवून पळून गेला आहे. याप्रकरणी कसायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गायी कापणारा, गोमांस विकत घेणारा, चालक व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित १९९५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.