मावळ (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज मावळ मधील उर्से गावातील शेतकऱ्यांशी, नागरिकांशी संवाद साधला. पार्थ पवार यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी यावेळी शेतमालाला भाव मिळत नसून भाजपा सरकारमुळे आम्हाला शेतमाल कमी किंमतीत विकण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली. तसेच आम्ही शेती करून पोट भरतो मुलांना शिक्षण देतो. पण आमची मुलं चांगले शिक्षण घेऊनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. मुलं बेरोजगार आहेत अशी खंत देखील शेतकरी महिलेने व्यक्त केली.
येणाऱ्या काळात घड्याळाला मतदान करा. मावळ मधील तरुण बेरोजगारांची संख्या कमी करून स्थानिक तरुणांनाच नोकऱ्या मिळवून देणार असल्याचे आश्वासन यावेळी पार्थ पवार यांनी दिले.