पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील फुल बाजारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. फुल बाजारातील परिस्थिती पाहता महापालिकेचे देशातील स्वच्छ भारत अभियानात अव्वल स्थान मिळविण्यासाठीचे प्रयत्न केवळ देखावा असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप फुल विक्रेत्यांनी केला आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220615-WA0031-300x287.jpg)
पिंपरीतील फुलबाजार सुरु होऊन अडीच वर्ष झाली. परंतु, वेळोवेळी मागणी करुनही महापालिकेकडून कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नसल्याचे व्यापारी तसेच शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांनी सांगितले. बाजाराची सध्यस्थिती पाहता सर्वञ घणीचे सम्राज्य पसरले आहे. त्यात पावसाळ्यात ही समस्या अधिकच जाणवत आहे.
महापालिकेचे या समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. फुल बाजाराला कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, नळ कनेक्शन, सिमेंटचा रस्ता या सर्व सुविधा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लक्ष घालून मार्गी लावाव्यात आशी मागणी फुल बाजारातील सर्व व्यापारी करत आहेत.