पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे ब्राह्मण सभेच्या वतीने शनिवारी (दि.८ जुलै) रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. राजवीर पॅलेस सोसायटीतील विलास जोशी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिक विठ्ठल देवगावकर, विजया तारे आणि वासंती जोशी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रामरक्षा स्त्रोतांचे सामुहिक पठण करण्यात आले.
जयवंत चौधरी यांनी अध्यात्मिक क्षेत्रातील गुरुचे योगदान आणि मानवी जीवनातील गुरुचे महत्व यासंबंधी विचार मांडले. गुरुपौर्णिमेचे औचित्य लक्षात घेऊन गुरुप्रती आदरभाव व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती तसेच भक्तीगीते यावेळी सादर करण्यात आली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांचा यानिमित्ताने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीनिवास पारखी, राजेंद्र देशमुख, राजन धोंगडे, नंदकुमार देशमुख, राजेंद्र कुलकर्णी, सुरेश तारे, तारकेश गोडबोले, रमेश भट, प्रकाश जोशी, शशांक खांडेकर, चारुहास शुक्ल, संतोष मुळे, श्रीनिवास जोशी, सुषमा शुक्ल, सुरेखा कुलकर्णी, भारती न्यायाधीश, सुरेखा अनिल कुलकर्णी, म्रुणाली जोशी, विजया तारे, आरती किणगी, शशिकांत कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, शंतनु जोशी, अभिजित जोशी, तृप्ती जोशी, आदिती जोशी, सुनीता देशमुख, छत्रेमॅडम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभेचे प्रमुख विलास जोशी यांनी केले. सुत्रसंचलन अनिल कुलकर्णी यांनी केले तर राजेंद्र तिखे-कुलकर्णी यांनी आभार मानले.