जालना (Pclive7.com):- मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. तसेच सगे सोयऱ्यांच्या नियमांची अंमलबजावणी सरकारला १ महिन्याचा वेळ दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य केल्यास आम्ही विधानसभेच्या रिंगणात उतरू, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकार मधील मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित जरांगे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित केलंय.
(बातमी अपडेट होत आहे.)