पिंपरी (Pclive7.com):- शेती माल हमी भाव, शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, आदी विषयात सरकार अपयशी ठरले अाहे. ‘असत्य, हिंसा, अशांती’च्या मार्गाने सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू आहे. त्याच्या निषेधार्ध आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘मौन’धारण करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले.
पिंपरीतील खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यात आले असून दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, नगरसेविका संगीता ताम्हाणे,सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेवक अतुल शितोळे, महंमद पानसरे, निलेश पांढरकर, पंडीत गवळी, राजेंद्र साळुंखे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विश्रांती पाडाळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.