पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील प्रगतशील शेतकरी सागर मोहन भूमकर यांना श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला यावर्षीच्या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगड, आमदार सुनील शेळके, भागवतचार्य हभप. चंद्रकांत महाराज वाजंळे, संचालक चेतन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संतोष महाराज पायगुडे, माजी आमदार कृष्णाराव भेगडे, दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे,किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, माऊली दाभाडे, भाऊसाहेब भोईर, माजी संचालक बाळासाहेब विनोदे यांच्यासह सर्व संचालक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भूमकर यांनी सन २०१३ ते २०१४ मध्ये द्वितीय क्रमांक, २०१४ ते २०१५ मधे तृतीय क्रमांक, २०१५ ते २०१६ मधे प्रथम क्रमांक पटकविला आहे या २०१८ ते २०१९ वर्षाच्या २२ व्या गळीत हंगामात ८१९ मेट्रिक टन उसाचा पुरवठा करीत त्यांनी प्रथम क्रमांक पटविला आहे. भूमकर हे संत तुकाराम करखान्यासह आंबेगाव येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देखील मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा करतात.