पुणे (Pclive7.com):- पत्रकारितेत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्युज १८ लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुस्कार देण्यात आला.
जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातुन अरुन पवार, पत्रकारीता क्षेत्रातील गोविंद वाकडे न्युज १८लोकमत, साहित्य क्षेत्रातील डॉ. अविनाश सांगोलेकर, कला क्षेत्रातील आनिल दिक्षीत, उद्योग क्षेत्रातील जितेंद्र जोशी, प्रशासठीय सेवा शैक्षणिक क्षेत्रातील राजीव मिस्रा, तर सांस्कृतिक कला क्षेत्रातील सुभाष यादव यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, बालहक्क आयोग सदस्य आसमा शेख, सामाजिक कार्यकर्ते मौलना काजमी, नगरसेविका आरती कोंडरे संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, संचालक आण्णा जोगदंड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश लालबिगे, मुंबई – ठाणे पालघर विभाग प्रमुख शकील शेख आदी उपस्थित होते.
श्रीपाल सबनीस म्हणाले की, ‘संविधान’ हाच राष्ट्र गंथ आहे, संविधान हे एका जातीचे, एका धर्माचे नाही. माहात्म्याला महामानवाला जात धर्माचे दरवाजे बंद करु शकत नाहीत. मानव अधिकाराचा पाय मुल्यात्मक आहे. यावेळी जनजागृती पदयात्रा महात्मा ज्योतीबा फुले वाड्यातुन करण्यात आली.
यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मानवी हक्क ,अधिकार हा विषय खुप व्यापक आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय बुद्धीच्या आधारे सांविधान बनविले आहे. त्याची वेळोवेळी पायमल्ली होत आहे. यासाठी शासन स्थरावर प्रयत्न अजून व्यापक व्होयाला हवेत. हक्क व अधिकाराशिवाय कर्तव्याची जाणीव मानसाला उपजत नाही. तथ्याशी तडजोड करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य होवू शकत नाही असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन मोरे, अरुन मुसळे, विकास शाहाणे , कपिल लांबे , प्रकाश बोदाडे, आनिल अँब्राल सर्व सभासद पदाधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मोनीका जोशी यांनी केले. आभार संचालक आनिल कदम यांनी मानले.