शिरूर (Pclive7.com):- सलग तीन वेळा खासदारकीची ‘हॅट्रिक’ करणारे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध प्रत्येकाच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून राज्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे असा सामना शिरुर लोकसभेत रंगला होता. काल या लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत ५९.४६ टक्के एवढे मतदान झाले. आता मतदारराजा नेमका कोणाला ‘कौल’ देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून अनेक तर्क-वितर्क तसेच चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या महिनाभरात शिरूरची रणधुमाळी विविध कारणांनी चर्चेची ठरली. शिवाजीराव आढळराव यांचा ‘चौकार’ आणि डॉ. अमोल कोल्हेंकडून त्यांचा होणारा ‘त्रिफळा’ या भोवतीच निवडणुकीचा प्रचार खेळत होता. सुरुवातीला जातीपातीच्या राजकारणामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी प्रचाराची सांगता झाली. २३ मे रोजी या शिरूर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण देशाचा निकाल लागणार आहे. मात्र बहुचर्चित ठरलेल्या या लढतीमुळे इथल्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी
जुन्नर – ६४.९०%
आंबेगाव – ७०.२९%
खेड-आळंदी – ६२.७६%
शिरूर – ६१.५२%
भोसरी – ५७.४८%
हडपसर – ४७.४८%
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी
(एकूण मतदार संख्या २१,७३,४८४)
जुन्नर – १,९३,९६५
आंबेगाव – १,९७,०५२
खेड-आळंदी – २,०२,७४०
शिरूर – २,२७,५४१
भोसरी – २,३७,७६७
हडपसर – २,३३,३१६
(झालेले एकूण मतदान – १२,९२,३८१)