सदाशिव खाडे यांना ‘समाज मित्र’ पुरस्कार प्रदान
पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्याचा मूलमंत्र दिला. तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीयांना संविधानाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखविला आहे. केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग वंचितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केले.
वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील बहुजन प्रतिष्ठान प्रणित बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अजय देहाडे प्रस्तुत ‘तुफानातले दिवे’ हा भीम गीतांचा कार्यक्रम व सदाशिव खाडे यांना ‘समाज मित्र’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. यावेळी सुभाष पारधी, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, भाजपा चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल, माजी नगरसेवक नामदेव ढाके, राजू दुर्गे, ॲड. मोरेश्वर शेडगे तसेच शेखर चिंचवडे, अनिता सोनवणे, कोमल काळभोर, पल्लवी वाल्हेकर, निशिगंधा वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, विलास शिंदे, आबा वाल्हेकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य मनोज तोरडमल करत आहेत. समाज विकासासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात हे कौतुकास्पद आहे, असे सदाशिव खाडे म्हणाले.
प्रास्ताविक मनोज तोरडमल यांनी केले. स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे पाठबळ मिळाले म्हणूनच परिसरात बुद्धविहार उभे राहिले. आज हजारो समाजबांधवांना या माध्यमातून मार्गदर्शन व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात, असे तोरडमल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन शेषेराव लोमटे ,बुध्दीसागर आठवले, दादा गणगे, श्रीकांत वाघमारे, कचरू पालके, सुधाकर सरेकर, महावीर जगताप, बालाजी पतंगे, अंकुश तेलंग, युवराज जगताप, लहु मस्के, गौतम गायकवाड, श्रुती तोरडमल यांनी केले.
आभार आबा वाल्हेकर यांनी मानले. अजय देहाडे यांच्या ‘तुफानातले दिवे’ भीम गीतांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.