पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले. तसेच पवना धरण ९७ टक्के भरले असून धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ खासदार बारणे यांच्या हस्ते पाणी विसर्ग करण्यात आला.
यंदाच्या वर्षी निसर्गाच्या कृपेने धरण लवकर भरले अाहे. खासदार बारणे यांनी सलग ३ वर्षे धरण क्षेत्रातून गाळ काढण्याचे समाज उपयोगी काम केले. त्यामुळे १० कोटी ३० लक्ष पाणी साठा धरणात वाढला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच धरणाच्या जवळील गावांना पाणी उचलायला मदत झाली.
यावेळी खासदार आप्पा बारणे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुका प्रमुख राजू खंडभोर, उपअभियंता नानासाहेब मतकरी, शाखाधिकारी गंदवा, अंकुश देशमुख, लक्ष्मण भालेराव, भारत ठाकूर, युवराज सुतार, बाळू शेलार, अनिल भालेराव, नितीन बुटाला, अक्षय एलवंडे, मदन शेडगे, शंकर दळवी, बाळू कलेकर, संदीप झांबरे, तसेच ग्रामस्थ, व कर्मचारी उपस्थित होते.