पिंपरी (Pclive7.com):- हरीनामाचा जयघोष करित पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले. या सोहळ्याचे स्वागत शहराच्या वतीने महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तसेच काही अंतर पालखी रथाचे सारथ्य देखील केले.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकात झालेल्या या स्वागत सोहळ्याला आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, मनोज सेठीया, प्रमोद ओंभासे, डॉ. ज्ञानदेव जुंधारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, थॉमस नरोन्हा, बापू गायकवाड, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विजयकुमार थोरात, सिताराम बहुरे, अमित पंडित, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे आदींनी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.
यावर्षी दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका तसेच झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले. स्वागताच्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. पारंपरिक वेशभुषेत असलेले आयुक्त शेखर सिंह यांनी अभंगावर ठेका धरत वारीत सहभाग घेतला तसेच फुगडीचा आनंदही घेतला.
प्रारंभी, पुना गेटसमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रतिनिधी रामनाथ मोरे, संतपिठाचे विश्वस्त राजू महाराज ढोरे, संचालिका स्वाती मुळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, नियतक्षेत्र वनअधिकारी एम. बी. बोडगे, पी. एस. भिकने, एस. के. बर्ले, ए. जी. कचरे, डि. बी. ऐतवाड यांच्यासह वारकरी आणि नागरिक आणि अतिरिक्त आयुक्त जिंतेद्र वाघ, प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बाबासाहेब गलबले, मनोज सेठीया, प्रमोद ओंभासे, ज्ञानदेव जुंधारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, थॉमस नरोन्हा, बापू गायकवाड, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सिताराम बहुरे, विजयकुमार थोरात, अमित पंडित, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे आदी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर भक्ती शक्ती चौकापर्यंत हरितवारी दिंडी काढण्यात आली. पर्यावरणाचा संदेश, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘हरितवारी प्लास्टिकमुक्त वारी’ असे फलक हातात धरून ही दिंडी स्वागत कक्षाच्या दिशेने मार्गस्थ झाली. यामध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सर्व अधिकारी, संतपिठाचे विद्यार्थी, शिक्षक, महापालिकेचे माजी पदाधिकारी, देहू संस्थानचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. स्वागताच्या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश असलेला सेल्फी पॉइंट सर्वांचा लक्ष वेधून घेत होता तर स्वागत कक्षाच्या बाजूला विठ्ठल तसेच संत श्री तुकारामांचे महाराजांचे फुलातील छायाचित्र रेखाटण्यात आले होते. तर एका चित्रकाराने पर्यावरण आणि वारी यांचा सुरेख संगम करत लाईव्ह चित्र रेखाटल्याच्या दृष्य आजच्या पालखी सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले.
आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. आकुर्डी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विसावला. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.