पिंपरी (Pclive7.com):- जळगाव येथे नुकत्याच घडलेल्या मातंग समाजातील युवकांना विहिरीत पोहले प्रकरणी झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केली.
अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सर्व पक्षीय व सर्व दलित संघटनांच्या वतीने जळगाव येथील दलित मुलांवर झालेल्या अमाणुष अत्याचार प्रश्नी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार चाबुकस्वार बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, मा.नगरसेविका सौ. झुंबरताई शिंदे, मा.नगरसेवक उत्तम हिरवे, मा.नगरसेवर अरूण टाक, काँग्रेस मावळ लोकसभा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, धुराजी शिंदे, बबन साके, मनोज तोरडमल, दशरथ कसबे, युवराज दाखले, भगवान शिंदे, नाना कसबे, राजु आवळे, राजन नायर, सुनिल भिसे, बापु वाघमारे, विठ्ठल कळसे, दिपक चकाले, तानाजी साठे, अविनाश कांबेकर, विशाल कसबे, अण्णा कसबे, पांडुरंग लोखंडे, महेंद्र सोनवले, गणेश अडागळे, भाळासाहेब खंदारे, निता वाल्मिकी, संदिप जाधव, सतिश भवाळ, श्रावण बगाडे, रेशमा पारधे, तुकाराम उदगीरे, वाल्मिकी समाज अध्यक्ष राजु परदेशी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.